कलर्स मराठीवरील 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत हिरप्पा बाळूच्या लग्नाची न ठरलेली गोष्ट पंचांकडे जाऊन सांगतो. त्यावर ती गोष्ट खरी की खोटी बघण्यासाठी गुंडप्पा आणि तात्या बाळूच्या घरी जातात. ते ऐकून गंगू चिडून तिथून लागलीच निघायचं बोलते. आणि बाळू देखील लग्न करणार नाही असं म्हणतो.